अखेर लिहितोय...
ब्लॉग लिहायचा असं ठरवून जवळपास दहा वर्षे झाली. ब्लॉग सुरूही केला. मात्र, त्यावर काही लिहिणं झालंच नाही. वृत्तपत्रात काम करीत असताना दररोजचे रिपोर्टिंग, नवीन विषय शोधून त्यावर लिहिणे, शिवाय रविवार पुरवणीसाठी लेख लिहिणे हा नित्यक्रम असायचा. वृत्तपत्रात कामाला सुरुवात करण्याआधी म्हणजे पत्रकारितेची शेवटची परीक्षा संपल्याबरोबर ब्लॉग सुरू केला होता. शाळेतील दिवस, कॉलेज जीवन, विद्यापीठातील दिवस, तसेच इतर अनेक आठवणी लिहिण्यासाठी ब्लॉगची निर्मिती केली होती. त्यामुळेच ब्लॉगला 'ते दिवस' हे नाव दिले. कामाच्या व्यापामुळे आजपर्यंत ब्लॉगवर लिहू शकलो नव्हतो. आज मात्र वृत्तपत्रातील कामाला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे 'त्या' दिवसांवर लिहायला सुरुवात करीत आहे.....आपलाच ज्ञानदा
शुभेच्छा
उत्तर द्याहटवा